गेले काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची कमालीची वाढ होत आहे, यातच नागरिकांचा निष्काळजीपणा ही कारणीभूत असून प्रशासनातर्फे आज मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लादण्यात येत आहे
- रात्री ११ ते सकाळी ५ या काळात राज्यामध्ये संचारबंदी असेल. म्हणजेच नाईट कर्फ्यू असेल.
- राज्यात आता जमावबंदी दिवसा असणार आहे. त्यामुळे ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येता येणार नाही.
- अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडता येईल. त्याशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध असेल
- सरकारी कार्यालयात सहजपणे भेट देता येणार नाही. आवश्यकता असेल तर मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी घ्यावी लागेल.
- खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम बंधनकारक असेल. कार्यालयात ५०% उपस्थिती
- लग्न समारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असेल
- अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी २०
जणांना परवानगी असेल
- सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांसाठी केवळ ५० जणांनाच परवानगी असेल
- राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद असेल. ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवता येईल.
- राज्यातील सर्व स्विमिंग पूल, जीम, स्पा,
वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद राहतील केश कर्तनालये केवळ ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. तर रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत
बंदी असेल
- पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क हे सर्व पुढील आदेशापर्यंत बंद
राहतील.
- शॉपिंग मॉल्स, शो रुम्स आणि बाजार कॉम्पलेक्स हे ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील - रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत हॉटेल बंद राहतील. होम डिलिव्हरी मात्र सुरु राहील
- नाट्यगृह, सिनेमागृह हे केवळ ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत सिनेमागृह बंद राहतील.
- नाट्यगृह, सिनेमागृहे यामध्ये केवळ संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी असेल.
Tags
CORONA