कोल्हापूर | औरंगाबाद जिल्ह्यातील पाझर तलाव फुटण्याची घटना ताजी असतानाच भुदरगड तालुक्यातील मेघोली लघू पाटबंधारे तलाव बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास फुटल्याची घटना घडली आहे. तलाव फुटल्याने पुराच्या पाण्यात बुडून नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते या महिलेसह चार जनावरांचा मृत्यू झाला. तलावाच्या बांधातील माती, दगड, गोटे वाहून ओढ्याकाठच्या शेतीत पडल्याने शेकडो एकर शेतीसह पिकांचे नुकसान झालेले आहे.
बुधवारी रात्री 9.45 वाजता सुमारास मोठ्या प्रमाणात पाणी ओढ्याला पाणी वाढल्यामुळे ग्रामस्थांना तलाव फुटला असल्याची शंका आली. ग्रामस्थांसह अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मेघोली, वेंगरूळ, ममदापूर, तळकरवाडी, सोनुर्ली या गावांना देऊन सतर्क केले. मात्र, नवले येथील धनाजी मोहिते, त्यांची पत्नी जिजाबाई, मुलगा नामदेव ओढ्या शेजारील जनावारांच्या • गोठ्यात जनावरे सोडण्यासाठी गेले होते. यावेळी जिजाबाई पाण्यातून वाहून जाऊन बुडून मृत्यू झाला. तर मुलगा नामदेव मोहिते झाडांचा आधार घेत बचावला. त्यांच्या चार बुधवारी रात्री 9.45 वाजता सुमारास मोठ्या प्रमाणात पाणी ओढ्याला पाणी वाढल्यामुळे ग्रामस्थांना तलाव फुटला असल्याची शंका आली. ग्रामस्थांसह अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मेघोली, वेंगरूळ, ममदापूर, तळकरवाडी, सोनुर्ली या गावांना देऊन सतर्क केले. मात्र, नवले येथील धनाजी मोहिते, त्यांची पत्नी जिजाबाई, मुलगा नामदेव ओढ्या शेजारील जनावारांच्या गोठ्यात जनावरे सोडण्यासाठी गेले होते. यावेळी जिजाबाई पाण्यातून वाहून जाऊन बुडून मृत्यू झाला. तर मुलगा नामदेव मोहिते झाडांचा आधार घेत बचावला. त्यांच्या चार अद्याप शोध लागलेला नाही, या दुर्दैवी घटनेने राज्यभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
दोन-तीन दिवसांपूर्वी चाळीसगाव व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात दरड कोसळली होती व चाळीसगावातील नद्यांना पूर आला होता त्यामुळे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील फुटल्याने शेती व पिकांसह अतोनात नुकसान झाले होते