📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा ! - हवामान विभागाचा अंदाज

राज्यात मॉन्सून सक्रिय झाल्याने अनेक भागांत ढगाळ वातावरण होत आहे - त्यामुळे मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे

त्यानुसार पुढील पाच दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अ‌लर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला आहे - असा अंदाज भारतीय हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी वर्तविला आहे

कुठे आहे पावसाचा अलर्ट ?

11 जुलै - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना रेड अ‌लर्ट जारी केला आहे - तर, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌लर्ट जारी केला आहे - तसेच पुणे सातारा, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी येलो अ‌लर्ट जारी केला आहे

12 जुलै - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला असून - पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌लर्ट दिला आहे - तर या दिवशी नाशिक, बुलडाणा, वाशिम, परभणी, हिंगोली,नांदेड आणि लातूरमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

13 जुलै - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला असून - पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌लर्ट दिला आहे - तर या दिवशी परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्यात पावासाचा अंदाज वर्तविला असून येलो अ‌लर्ट देण्यात आला आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने