राज्यात मॉन्सून सक्रिय झाल्याने अनेक भागांत ढगाळ वातावरण होत आहे - त्यामुळे मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे
त्यानुसार पुढील पाच दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे - असा अंदाज भारतीय हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी वर्तविला आहे
कुठे आहे पावसाचा अलर्ट ?
11 जुलै - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे - तर, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे - तसेच पुणे सातारा, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी येलो अलर्ट जारी केला आहे
12 जुलै - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला असून - पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे - तर या दिवशी नाशिक, बुलडाणा, वाशिम, परभणी, हिंगोली,नांदेड आणि लातूरमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
13 जुलै - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला असून - पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे - तर या दिवशी परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्यात पावासाचा अंदाज वर्तविला असून येलो अलर्ट देण्यात आला आहे