कोरोनाचा संसर्ग आता हवेतूनही होत असल्याची खळबळजनक माहिती टास्क फोर्स ने दिली आहे, त्यामुळे आता बचावासाठी दोन मास्क वापर करण्याचा सल्ला टास्क फोर्स तर्फे देण्यात आला आहे.
कोरोना महामारी महाराष्ट्रासह भारतात अत्यंत वेगाने फैलावत असून रेमदेसिविर, ऑक्सिजन व बेड्स ची कमतरता भासत असल्याने तसेच रुग्णांना लवकर बेड्स न मिळाल्याने ही महामारी पसरण्यास होण्यास आणखीच मदत होत आहे,
विशिष्ट नागरिकांनी योग्य पद्धतीचे मास्क न वापरल्यामुळे, तसेच कोरोना रोखण्यासाठीच्या पद्धतीचा वापर न केल्यामुळे कोरोनाविषाणू अधिक प्रमाणात हवेत मिसळत आहेत. यामुळे इतर लोक बाधित होत असून हवेतील कोरोना विषाणू चक्रवाढ अधिकच वाढण्याची भीती टास्क फोर्स तर्फे व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी उच्च क्वालिटीचा मास्क परिधान करणे त्यातल्या त्यात दोन मास घालने सोयीचे आहे