पुत्रप्राप्ती संदर्भात केलेल्या वक्तव्यावर इंदुरीकर यांच्या विरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असुन या अगोदर संगमनेर जिल्हासत्र न्यायालयाने खटला रद्द केला होता. त्यानंतर आता अनिस पक्षाने औरंगाबात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर पुढील ८ आठवड्यानंतर याची पुढील सुनावणी होणार आहे. इंदुरीकर महाराजांसह सरकारी पक्षाला प्रतिवादी करण्यात आले आहे. मात्र आद्याप पर्यंत या संपुर्ण प्रकरणावर इंदोरीकर महाराजांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ऍड. रंजना गवांदे यांनी आज औरंगाबाद न्यायालयामध्ये महाराजांच्या पुत्रप्रात्पी व्यक्तव्याबद्दल याचिका दाखल केल्याचे सांगितले आहे.
काय आहे प्रकरण ??
स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला असे वक्तव्य त्यांनी केले होते.