📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

दहावीचा निकाल जूनअखेर जाहीर होणार

मालेगाव (प्रतिनिधि) कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात मोठं आव्हान निर्माण झालं होतं. ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण गेले वर्षभर सुरू होते. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. गतवर्षी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे नववीच्या मुलांना उत्तीर्ण करण्यात आलं होत. एकीकडे दहावीच्या परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असताना दुसरीकडे या वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन होणार आहे, याबाबतची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे आता न्यायालय काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्षा रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू असं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील, असं म्हटलं आहे

- मूल्यमापन पुढील पद्धतीने होईल -
• दहावीच्या लेखी परीक्षेला 30 गुण
• गृहपाठ तोंडी परीक्षेला 20 गुण
• नववीच्या अंतर्गत परीक्षेला 50 गुण

दहावीचा निकाल कसा लावणार?

• विद्यार्थ्यांचे इ १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण देण्यात येतील.

• विद्यार्थ्यांचे इ १० वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण देण्यात येतील.

• ९ वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी ५० गुण देण्यात येतील.

•निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लावण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे.

 • इ. ११ वीच्या प्रवेश परीक्षा राबववताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेनुसार महाविद्यालयांत प्राधान्य देण्यात येणार आहे.

• ज्या विद्यार्थ्यांना या पद्धतीनं दिलेले गुण मान्य नसतील, त्यांच्यासाठी कोविडनंतरच्या काळात परीक्षा आयोजित केली जाणार असल्याचेही वर्ष गायकवाड यांनी स्पष्ट केले.

सदर मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणाचे मुल्यमापन करण्यात येईल, यामध्ये इयत्ता नववी व इयत्ता दहावी, सुधारित मुल्यमापन धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी दहावी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांवर आधारित असेल. 100 गुणांच्या मूल्यमापन पद्धतीत विद्यार्थी समाधानी नसेल, तर बोर्डाच्या दोन परीक्षांच्या संधी मिळतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने